दही हा बहुतेक जणांचा आवडीचा पदार्थ. कोणतेही शुभ कार्य करते वेळी हातावर दही साखर ठेवली जाते. तसेच दह्यापासुन अनेक पदार्थसुद्धा तयार केले जातात. उन्हाळ्य़ाच्या दिवसात दह्याचे सेवन करणे शरीरास फायदेशीर असते. ते शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. दह्यामुळे डि*हा*य*ड्रे*श*न होत नाही. दह्यात विटामिन बी2, बी12 आणि प्रो*बा*यो*टि*क पोटैशियम असते. मात्र दह्याचे सेवन तुम्ही चुकीच्या गोष्टींसोबत केल्यास ते अपायकारक ठरु शकते. ते शरीराला पचण्यास जड जाते.

दही आणि दुध – दही आणि दुध एकत्र सेवन केल्यास अपाय होऊ शकतो असे आयुर्वेदात सुद्धा म्हटले आहे. रात्री दही खाल्यानंतर दुध पिऊ नये. त्यामुळे गॅस, पोटदुखी, डा*य*रि*या, कफ यासांरख्या समस्या होऊ शकतात. जर दुध दही सेवन करायचे असल्यास त्यातील अंतर दोन तासांचे ठेवावे.

दही आणि केळे – काही जणांना सकाळी नाश्त्याला दही आणि केळे खायची सवय असते. पण असे खाल्यास नुकसान पोहचण्याची शक्यता असते. यामुळे उलटी सारखे होऊ शकते. तसेच त्याच्या सेवनामुळे त्वचेचे रोग सुद्धा होऊ शकतात.

दही आणि पिकलेला आंबा – उन्हाळ्यात पिकेलेले आंबे प्रत्येक जण खातात. त्यातील काही लोकांच्या आहारात दह्याचा समावेश असतो. पण दह्यामुळे शरीराला जरी गारवा मिळत असला तरी आंबा हा शरीरासाठी गरम असतो. त्यामुळे असे दोन वेगवेगळे गुणधर्म असलेले पदार्थ सेवन केल्यास पोट खराब होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे त्वचेसंबधी समस्या देखील उद्भवु शकतात. रात्रीच्यावेळी तर अशा गोष्टींचे सेवन बिलकुल करु नये.

दही आणि कांदा – कोशिंबीर तयार करताना त्यात दह्य़ाचा वापर केला जातो. त्या कोशिंबिर मध्ये कांदा घातल्यास तो आरोग्यासाठी हानिकार असतो. ते खाल्यास डायरिया, उल्टी, पोट दुखी यांसारखे आजार होऊ शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *